जिल्हा

बोलेरो गाडी विहिरीत कोसळली, चौघांचा मृत्यू

जामखेड,( ऑनलाइन प्रतिनिधी) जामखेड शहरालगत असणार्‍या जांबवडी रस्त्यावर बुधवार (दि.15) दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. या अपघातात बोलेरो चारचाकी वाहन रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे नियंत्रण सुटून थेट रस्त्या शेजारी असणार्‍या विहिरीत कोसळले. या दुर्दैवी घटनेत चारजणांचा मृत्यू झाला.

याबाबत माहिती अशी की, अपघातातील बोलेरो वाहन जांबवडी गावाच्या दिशेने जामखेडकडे येत असताना रस्त्यावर पडलेल्या खडीवरून गाडी घसरली. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बोलेरो रस्त्यालगत असलेल्या बिगर कठ्याच्या विहिरीत (Well) कोसळली. या अपघातानंतर जोराचा आवाज झाल्याने सर्वाचे लक्ष त्याकडे गले. अपघातामुळे जांबवडी परिसरात शोककळा पसरली. असून अशोक विठ्ठल शेळके (वय 29 रा. जांबवाडी), रामहरी गंगाधर शेळके (वय 35 रा. जांबवाडी), किशोर मोहन पवार (वय 30 रा. जांबवाडी), चक्रपाणी सुनील बारस्कर (वय 25 रा. राळेभात वस्ती) या चौघांचा मृत्यू झाला आहे. हे बोलरो तरूण मातकुळी कडून जांबवाडी मार्गी जामखेडकडे येत होते

रस्त्यावर काम करणाऱ्या लोकांनी ही घटना पाहिली आणि जामवाडीच्या ग्रामस्थांना बोलावले. गावातील काही लोक लगेच मदतीला धावले. काही तरुण दोरीच्या साहाय्याने या विहिरीत उतरले, ज्या विहिरीला प्लॅटफॉर्म किंवा पायऱ्या नव्हत्या. त्याने चारही तरुणांना विहिरीतून बाहेर काढले. यावेळी तिथे खूप गर्दी होती.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जामखेड येथील संजय कोठारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली. समर्थ रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून या तरुणांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे सांगितले. चारही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker