कृषीजिल्हा

तहसील कार्यालयावर हल्लाबोल सत्याग्रह आंदोलन सुरू

न्यायाच्या प्रतीक्षेत सरोदे कुटुंब आणि ग्रामस्थ

नगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील महसूल प्रशासन आणि तहसीलदार यांच्या गलथान कारभाराच्या विरोधात चिचोंडी पाटील येथील सरोदे कुटुंबीय व सरपंच शरद पवार यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात घरगाडा घेऊन उपोषण आंदोलन सुरू केले आहे. मागील नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे.

तहसील आवारात उपोषणाला बसलेले चिचोंडी पाटील येथील सरोदे कुटुंबीय व ग्रामस्थ

सरोदे कुटुंबीयांचे चिचोंडी पाटील गावातील जमीन चोरीस गेल्याची तक्रार असून, ती जमीन परत मिळावी यासाठी उपोषण करण्यात येत आहे. मात्र, नऊ दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे, आज संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि नागरिकांनी तहसील कार्यालयावर हल्लाबोल सत्याग्रह आंदोलन छेडले. महसूल प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या आंदोलनात सरपंच शरद पवार, प्रकाश पोटे, अरुण रोडे, नितीन पाटील लिगडे यांच्यासह पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी एक शिष्टमंडळ तहसीलदारांची भेट घेऊन आपली मागणी मांडली. तहसीलदारांनी सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करून सरोदे कुटुंबीयांनी पुन्हा उपोषण सुरू ठेवले आहे.

या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून, न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker