नातेवाईकच जीवावर उठले, दोन सख्ख्या भावांना संपवले बीड पुन्हा हादरले

आष्टी (रियाज पठाण)- बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या झाली आहे. चाकूने हल्ला करून त्यांच्या नातेवाईकानेच त्यांचा खून केल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.
बीडमधील वाढलेली गुन्हेगारी सध्या चर्चेचा विषय आहे. बीडमधील गुन्हेगारी रोखण्यात पोलीस प्रशासन सपशेल फेल झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. यातच बीड पुन्हा दुहेरी हत्येनं हादरलं आहे. दोन सख्ख्या भावांचा हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.
आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरात ही घटना घडली आहे. हत्या झालेल्या सख्ख्या भावांची नावे अजय भोसले (30 वर्ष) आणि भरत भोसले (32 वर्ष) आहेत. नातेवाईकानेच दोघांची हत्या केल्याची माहिती मिळत आहेत. अजय आणि भरत भोसले यांचा नातेवाईकांसोबत जुना वाद होता. याच वादातून रात्री हत्याकांड घडल्याचे समजते.
दोघे भाऊ आष्टी तालुक्यातील हातवळण या गावचे आहेत. याच गावापासून 5 किलोमीटर अंतरावर वाहिरा गावच्या परिसरात ही घटना घडली. दोघांचे मृतदेह आष्टी उपजिल्हा रुग्णालयात शुभविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत. या प्रकरणी अंभोरा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी संशयित 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अंभोरा पोलीस अधिक तपास करत आहेत. हत्या नेमकी कधी झाली , कशी झाली, काय वाद होता याची पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.